दि.२२ मार्च ते ८ मे २०२० या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख २४५ गुन्हे नोंद झाले
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख २० हजार ६९७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच राज्यात १ लाख २४५ गुन्ह्यांची नोंद झाली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ८ मे २०२० या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख २४५ गुन्हे नोंद झाले असून १९ हजार २९७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.