नागरिकांनो सतर्क राहत खबरदारी घ्या: जलसंपदा मंत्री जयंत पाटील
आपली जबाबदारी ओळखत सोशल डिस्टसिंगचे पालन करा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. जिल्ह्यात नवे रुग्ण आढळल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहत खबरदारी घ्यावी.
जिल्हा पूर्वपदावर येत असताना पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करणे काही योग्य ठरणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखत सोशल डिस्टसिंगचे पालन करायला हवे. रुग्णांची संख्या महानगरपालिका क्षेत्रात जास्त वाढत आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा
मंत्री विश्वजीत कदम, खा. संजयकाका पाटील, खा. धैर्यशील माने, आमदार सुमनताई पाटील, विक्रम सावंत, मानसिंग भाऊ नाईक, सुरेश खाडे, अनिल बाबर, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दूडी